[ad_1]

अहमदनगर : आशिया खंडातील सर्वात मोठे कुंड म्हणून ओळख असणाऱ्या निघोज येथील रांजण खळगे पाहायला अनेक पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणाहून येत असतात. पावसाळ्यात तर अनेक जण पाण्याच्या ठिकाणी फिरायला जातात. असेच एक दाम्पत्य पारनेर तालुक्यातील निघोज येथे आले होते, मात्र त्यांच्यासोबत एक दुर्घटना झाली.

निघोज येथील एका कुंडात पडून महिलेचा मृत्यू झाला. त्या महिलेचा मृतदेह तब्बल ३८ तासाच्या तपासानंतर हाती आला. पुणे-नगर जिल्ह्याच्या सीमेवरील कुंड पर्यटन स्थळावरील रांजण खळगे पाहत असताना मंगळवारी (दि.८) सायंकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास पाय घसरून रांजण खळग्यात पडलेल्या महिलेचा मृतदेह तब्बल ३८ तासांनंतर गुरुवारी सापडला आहे.

शाळेत पोरं भांडली, बाहेर पालक भिडले; कोल्हापुरात राडा, मारामारीत एकाचा मृत्यू
वाशिम जिल्ह्यातील पद्माबाई शेषराव काकडे (रा. मोहगव्हाण ता. कारंजा) ही ५५ वर्षीय महिला आपल्या नातेवाईकांसोबत रांजण खळगे पाहत असताना तिचा पाय घसरल्याने पाण्याच्या प्रवाहात पडली होती. तिला वाचविण्यासाठी तिचे जावई महेंद्र शहादेव औताडे यांनी पाण्यात उडी घेतली. काही अंतरापर्यंत त्यांनी महिलेला पकडले मात्र नंतर पाण्याच्या वेगामुळे खाली खोलातील खड्डयात महिला गेल्याने तिची साडी औताडे यांच्या हातात राहिली होती.

तुझी सोनसाखळी कुठेय? व्हिडिओ कॉलवर अमित शाहूशी वाद, भाजपच्या महिला नेत्यासोबत घातपात
सोबत असलेल्या नातेवाईकांनी आरडा ओरडा केल्यामुळे स्थानिकांनी तिकडे धाव घेत महेंद्र औताडे यांना पाण्यातून बाहेर ओढले, मात्र महिलेचा तपास लागला नाही. पर्यटकांनी रांजण खळगे पाहण्यासाठी आल्यानंतर फोटोसेशन करताना किंवा पर्यटनाचा आनंद लुटताना योग्य ती खबरदारी घ्यावी, आपल्या जीवावर बेतेल अस काही करू नये.

मुसळधार पावसात बैलगाडी उलटली, तीन शेतकरी वाहून गेले

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *