[ad_1]

कोलंबो : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे थांबला आहे. पण जर पावसामुळे २० षटकांचा खेळ झाला तर पाकिस्तानला किती धावांचे टार्गेट देण्यात येऊ शकते, हे आता समोर आहे आहे.

भारताने प्रथम फलंदाजी करताना ३५६ धावा केल्या आहेत. भारताने जवळपास ७ च्या सरासरीने या धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानने ४४ धावांत दोन विकेट्स गेल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तानला आता या पावसाचा मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे जर आता सामना जर २० षटकांचा झाला तर त्यांना मोठे आव्हान मिळू शकते. पावसामुळे आता षटकं कमी केली जातील. त्यामुळे प्रत्येक पाच षटकं कमी केल्यावर पाकिस्तानला किती धावांचे टार्गेट देण्यात येऊ शकते, हे आता समोर आले आहे.

जर हा सामना ३० षटकांचा खेळवण्यात आला तर पाकिस्तानला २६७ धावांचे आव्हान देण्यात येऊ शकते. पण जर हा सामना २५ षटकांचा खेळण्याचे ठरवले तर पाकिस्तानला विजयासाठी २३७ धावांचे आव्हान देता येऊ शकते. पण जर हा सामना २० षटकांचा झाला तर पाकिस्तानला विजयासाठी २०० धावा कराव्या लागतील, हे आता समोर आले आहे. त्यामुळे जर हा सामना २० षटकांचा झाला तर पाकिस्तानचा पराभव निश्चित समजला जात आहे. त्यामुळे आता हा सामना किती षटकांचा होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. हा सामना आता कधी सुरु करायचा, याचा निर्णय मैदानातील पंच घेतील. आता पाऊस थांबला असला तरी मैदान ओले आहे. त्यामुळे पंच मैदानाची पाहणी करतील आणि त्यानंतर हा सामना किती षटकांचा खेळवायचा, याचा निर्णय घेतला जाईल.

आशिया चषक: भारत व पाकिस्तान यांचा आज सामना

Update about potential targets with overs lost: Pakistan’s target will be 200 if it gets reduced to 20 overs. 237 for a 25-over game and 267 for 30 overs. The game can start as late as 11.15pm

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *